Monday, July 20, 2009

पुण्याची मेट्रो आणि आपण

सध्या पुण्याला मेट्रो हवी की नको यावर सर्व मोठे लोक चर्चा करत आहेत
या विषयावर खरेतर जे २० - ३० वयातले आहेत, ते सोडून इतर लोकच जास्त बोलत आहेत। जेव्हा मेट्रो चालू होइल तेव्हा आजच्या २०-३० वयातली लोकानाच याचा फायदा होणार आहे, तेच याचा कर, टोल भरणार आहेत, आणि जे आज बोलत आहेत ते तेव्हा एक रुपयाचा टोल देणार नाहीत। आपल्यला मोठी योजना हवी आहे।
एक आयडिया आहें
आपण जर पूर्ण विचार केला तर असे लक्षात येइल की विकास हा सर्व परिसराचाच करावा लागेल
१ ग्रेटर पुणे ही संकल्पना मान्य करावी लागेल, यात पुणे ते इन्दापुर, पुणे ते सातारा , पुणे ते नगर, पुणे ते लोनावाला, पुणे ते जुन्नर, पुणे ते महाड, पुणे ते सासवड हा परिसर विकसित करावा लागेल
या सर्व परिसरातून एका एंड पासून दुसरीकडे १५-२० मिनिटात पोचता आले पाहिजे
या विकासात खालील मुद्यांचा विचार करावा लागेल
१ पाणी - शेतीचे व प्यायला
२ वाहतुक - रस्ते, रेलवे , मेट्रो, मोनो रेलवे, बीआरटी , हैलीपैड -खासगी, हौस्पितलसाठी, डोमेस्टिक एअरपोर्ट, भव्य इंटरनेशनल एअरपोर्ट, शेतिमाल, फूले, गुड्स एक्सपोर्टसाठी एअरपोर्ट वर सुविधा
३ ड्रेनेज, कचरा: ई कचरा, प्लास्टिक, ओला कचरा, टीन
४ शाला, कोलेज, विद्यापीठ व स्टूडेंट्स यांची सोय
५ इंटरनेशनल एन्टरतैन्मेंट जसे डिस्ने लैंड , फुटबॉल ग्राउंड
६ संपूर्ण संगणक आधरित - वीज, पाणी, रस्ते, रेलवे, सिग्नल, सरकारी सिस्टिम
७ नुक्लेअर बेस्ड विज सप्लाई
८ घर पॉलिसी
७ पर्यावरण साठी वन विकास योजना
आता मेट्रो विषयी
मेट्रो जर कात्रज आणि शिवाजीनगर जोडणार असेल तर फार काही उपयोगी नाही, मेट्रोने ग्रेटर पुणे जोडले तर उपयोग होईल। लोकाना पुणे शहरात न रहता काम करता आले पाहिजे। घरे अतिशय स्वस्तात मिलाली पाहिजेत